0

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये देशभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट बरीच चर्चेत आली. काँग्रेसबाबत या दोघांनी केलेल्या विधानांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण देखील रंगलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी टीकाकारांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधी यांचं सरकार असताना देशात आलेल्या आणीबाणीचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्याशी तुलना केली आहे.

मुंबई दौऱ्यामध्ये “देशात युपीए आहेच कुठे?” असा सवाल उपस्थित केल्यामुळे काँग्रेसच्या निशाण्यावर आल्यानंतर आता ममता बॅनर्जींवर भाजपाकडून टीका होण्याची शक्यता आहे. देशातील शेतकरी आंदोलन मोदी सरकारने ज्या पद्धतीने हाताळलं, ते चुकीचं होतं, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. १९७५ साली इंदिरा गांधींचं सरकार असताना देशात आणीबाणी लागू झाली, त्यानंतर लोकांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आताही जनता मोदींना देईल, असं ममता बॅनर्जींनी त्यांच्या विधानामधून सूचित केलं आहे.

Post a Comment

 
Top