0

 एकेकाळी भारतातल्या टॉपच्या उद्योगपतींमध्ये समावेश असलेले रिलायन्स समूहाचे अनिल अंबानी सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यासाठीची प्रक्रिया भारतीय रिझर्व बँकेने सुरू केल्याची माहिती मिळत आहे. यासाठी आरबीआयने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडे परवानगी मागितली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयने सांगितलं की रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे एक निवेदन दिलं आहे. त्यामध्ये दिवाळखोरीसंदर्भातल्या कायदेशीर बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आरबीआयने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडे दाखल केलेल्या अर्जानंतर रिलायन्स कॅपिटलवर अंतरिम स्थगिती असेल. यामध्ये, कर्जदार कंपनी आपली कोणतीही मालमत्ता हस्तांतरित किंवा विकू शकणार नाही.

Post a Comment

 
Top