0

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक अपार्टमेंट येथील घरी दोघांची भेट झाली. तत्पूर्वी, ममता यांनी मुंबईतील वायबी चव्हाण हॉलमध्ये नागरी समाजातील लोकांची भेट घेतली. येथे त्या म्हणाल्या- सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाचा सहज पराभव होऊ शकतो.

ममतांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. "जर कोणी काही केले नाही आणि परदेशात राहिले तर कसे चालेल,". केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाचा चेहरा बनणार का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की, मी एक लहान कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहायचे आहे. मात्र, ज्यांचा स्वत:वर विश्वास आहे, ते सर्व काही करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

पुढच्या वर्षी 5 राज्यांच्या निवडणुकांपूर्वी बैठकीचा राजकीय अर्थ
ममतांचे काँग्रेसपासूनचे वाढते अंतर आणि तिसर्‍या आघाडीचे आवाहन, पवार यांच्या भेटीतून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा पुढील वर्षी 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मंगळवारी ममता यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही त्यांचे मुंबईत स्वागत करतो. ही मैत्री आम्हाला पुढे न्यायची आहे.

Post a Comment

 
Top