0

 काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शनिवारी पुनरोच्चार केला की, ते येणाऱ्या काळात अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्यानंतर मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरील मौनाविषयी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

शनिवारी नाना पटोले यांनी म्हटले, 'आम्ही मागे हटलेलो नाही. जेव्हा त्यांचे चित्रपट रिलीज होतील किंवा आम्हाला ते दिसतील तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही लोकशाहीच्या नियमांचे पालन करु. आम्ही 'गोडसेवाले' नाही तर 'गांधीवाले' आहोत.'

आम्ही अक्षय आणि अमिताभ यांच्याविरोधात नाही
नाना पटोले हे देखील म्हणाले, 'मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात नाही तर त्यांच्या कामाविरोधात बोलायचो. ते असली हिरो नाहीत. जर ते हिरो असते तर, लोकांच्या कष्टादरम्यान त्यांच्या जवळ उभे राहिले असते. मात्र, त्यांना फक्त 'कागदी वाघ' बनून रहायचे असेल तर माझी हरकत नाही'



Post a Comment

 
Top