भारताचे गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बंगालात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले आहेत. पहिल्या दिवशी गुरुवारी त्यांनी कोलकतातील भारत सेवाश्रम संघात जाऊन पुजा करत कार्यक्रमाला सुरूवात केली. यानंतर ते गंगासागरातील कपिल मुनी आश्रमचा दौरा करणार आहेत. येथे नारायणपुरी गावांतील गरीब शरणार्थी कुटुबांसोबत जेवण करतील. तसेच, काकद्वीपात भाजपच्या पाचव्या परिवर्तन सभेला संबोधित करत हिरवा झेंडा दाखवतील.
7 दिवसांत दुसरा दौरा
अमित शहा यांचा हा 7 दिवसातील दुसरा दौरा आहे. यापुर्वी ते 11 फेब्रुवारीला ठाकुरनगरतील एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी सांगितले होते की, आम्ही नागरिकता संशोधन कायदा घेऊन आलो होतो. परंतू, मध्येच कोरोनाचे संकट आले. यावर टीका करतांना ममता दिदींनी सांगितले होते की, हे सर्व आश्वासन खोटे आहेत. त्यांनी सांगितले की, आम्ही जे सांगतो, तेच आम्ही करतो. देशात लसीकरण पूर्ण होताच, आणि कोरोनापासून मुक्तता मिळताच तुम्हा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करणार आहे.
Post a Comment