0

 


कोरोना संक्रमणात मुंबईच्या स्थानिक स्वराज संस्थेने गेल्या वर्षी एप्रिलपासून आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या 15 लाख लोकांकडून 30 कोटी रुपये दंड वसूल केले आहे. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, गेल्या सोमवारी 13,008 लोकांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 26,01,600 रूपये दंड आकारण्यात आला आहे.

महानगरपालिकेने एप्रिल 2020 पासून यावर्षीच्या 15 फ्रेबुवारीपर्यंत 15,16,398 लोकांना सार्वजनिक ठिकाणावर विना मास्क पकडून त्यांच्याकडून 30,69,09,800 रूपयाचा दंड वसूल केला.

मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट 4.50%

मुंबईत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 721 नवीन प्रकरण समोर आले. या आजारामुळे तीन लोकांचा मृत्यु झाला आहे. मुंबईत आतापर्यंत मृतांची संख्या 11428 आहे. सध्या मुंबईत 5,143 अॅक्टिव्ह केसेस आहेत. यात 82% लोकांवर घरीच उपचार सुरू आहेत. यामुळे सध्या हॉस्पीटलवर कोणत्याच प्रकारचे परिणात दिसत नाही आहे. यातील 18% प्रकरण हे एकट्या हाय राईज बिल्डिंग परिसरातील आहे. मात्र, शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 4.50% आहे.

बीएमसीकडून वसूल करण्यात येतो 200 रुपये दंड

महाराष्ट्रात कोविड-19 संक्रमणामुळे दिवसेंदिवस रूग्ण वाढत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चिंता वाढली आहे. मंगळवारी त्यांना लोकींना सरकारी निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, वाढत्या प्रकरणामुळे मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवत येणाऱ्या लॉकडाउनसाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहे. महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणावर विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून 200 रूपायाचा दंड वसूल करण्यात येत आहे.



Post a Comment

 
Top