ॲडलेड :
कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक आणि महेंद्रसिंह धोनीच्या अर्धशतच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळविला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे
पहिल्या सामान्यात १३३ धावा करणारा रोहित शर्मा आज ४३ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलमीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ४७ धावांची भागिदारी रचल्यानंतर चांगल्या टचमध्ये दिसणारा शिखर धवन बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. शिखरने आक्रमक फलंदाजी करत काही आकर्षक फटके मारले. त्याने २८ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. शिखर बाद झाल्यावर आलेल्या चेस मास्टर विराट कोहली आणि रोहित शर्माने भारताची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताचे शतक धावफलकावर लावले. ही जोडी दुसऱ्या विकेसाठी मोठी भागिदारी रचणार असे वाटत असतानाच स्टॉयनिला पूल मारण्याचा रोहितचा प्रयत्न फसला आणि तो ४३ धावांवर झेलबाद झाला.
वाचा : पुजारा संघातील ‘व्हाईट वॉकर’ : विराट
रोहित बाद झाल्यावर धावगती वाढण्याची जबाबदारी विराटने आपल्या शिरावर घेतली. त्याने भारताची ५ च्या वर असलेला रनरेट खाली येऊ दिला नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अंबाती रायडूने विराटला चांगली साथ देत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. पण, आक्रमक खेळण्याच्या नादात रायडूने आपली विकेट फेकली. त्यानंतर आलेल्या धोनीने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. विराटने एकदिवसीय सामन्यातील आपले ३९ सावे शतक पूर्ण केले. विराट आणि धोनीच्या खेळीने भारत विजयाच्या उंबरठ्यावर आला असताना विराट १०४ धावांवर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने तडाखेफाज फलंदाजी करत भारताचा विजय सोपा केला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता असतानाच शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने शानदार षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून भारताला विजय मिळवून दिला.
वाचा : बीसीसीआयच्या निर्णयाला गावसकर यांचा पाठिंबा
तत्पूर्वी, भारतासाठी मस्ट विन असणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ॲडलेडच्या उष्ण वातावरणात हा निर्णय अपेक्षितच होता. पण, कांगारुंच्या बॅटिंग पिचवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या मनसुब्यांना भुवनेश्वर आणि शामी या जलदगती जोडीने सुरुंग लावला. या दोघांनीही दोन्ही सलामीवीरांना पाठोपाठ तंबूत पाठवले. भुवनेश्वरने कर्णधार फिंचचा ६ धावांवर त्रिफळा उडवत पहिला धक्का दिला. तर शामीने ॲलेक्स केरीला धवनकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. यामुळे कांगारुंची ८ षटकात २ बाद २६ धावा अशी अवस्था झाली.
वाचा : माफीनंतरही हार्दिक-राहुलवर टांगती तलवार
दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर आलेल्या शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. पण ही भागिदारी फुटली ती जडेजाच्या डायरेक्ट हीटने जडेजाने ख्वाजाचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला २१ धावांवर रनआऊट केले. यानंतर आलेल्या हॅडस्कबच्या साथीने शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाचे शतक स्कोरबोर्डवर लावले. शॉन मार्शने आपले अर्धशतक पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
शॉन मार्शने एक बाजू लावून धरली असताना दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने फलंदाज बाद होत होते. गेल्या सामन्यात ७३ धावांची खेळी करणाऱ्या हँडस्कबने २० धावा करत शॉन मार्शची साथ सोडली. तो जडेजाच्या फिरकीत फसला. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनिसने मार्शबरोबर पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. दरम्यान, शॉन मार्श आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. ही भागिदारी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शामी पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. त्याने स्टॉयनिसला २९ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
स्टॉयनिस बाद झाल्यावर धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल क्रिजवर आला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आपल्या २०० धावा पूर्ण केल्या. याच बरोबर शॉन मार्शनेही आपले वनडेमधील आपले सातवे शानदार शतक पूर्ण केले. अखेरची १० षटके राहिलेली असताना क्रिजवर एक सेट फलंदाज आणि एक धडाकेबाज फलंदाज असल्याने ऑस्ट्रेलिया आता आक्रमक खेळणार या काही शंकाच नव्हती. मॅक्सवेलने ४३ वे षटक टाकणाऱ्या कुलदीप यादवच्या एकाच षटकात दोन षटकार मारत आपले मनसुबे जाहीर केले.
मार्श आणि मॅक्सवेल यांनी अखेरच्या काही षटकात आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, रोहितने धोकादायक मॅक्सवेलला सिराजच्या गोलंदाजीवर जीवनदान दिले. सुदैवाने हे जीवनदान फार धोकादायक ठरले नाही. कारण, भुवनेश्वरने मॅक्सवेलला ४८ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ भुवीने शॉन मार्शची १३१ धावांची शानदार शतकी खेळीही त्याच षटकात संपवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ४८ षटकात ७ बाद २८३ धावा झाल्या. अखेरची दोनच षटके शिल्लक असताना दोन नवीन फलंदाज क्रिजवर आल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला ब्रेक लागला. सिडल ० तर रिचर्डसन १ धावांची भर घालून माघारी परतले. त्यानंतर लायनने अखेरच्या तीन चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारल्याने ऑस्ट्रेलियाला भारतासमोर २९९ धावांचे आव्हान ठेवता आले.
.
कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक आणि महेंद्रसिंह धोनीच्या अर्धशतच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळविला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे
पहिल्या सामान्यात १३३ धावा करणारा रोहित शर्मा आज ४३ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलमीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ४७ धावांची भागिदारी रचल्यानंतर चांगल्या टचमध्ये दिसणारा शिखर धवन बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. शिखरने आक्रमक फलंदाजी करत काही आकर्षक फटके मारले. त्याने २८ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. शिखर बाद झाल्यावर आलेल्या चेस मास्टर विराट कोहली आणि रोहित शर्माने भारताची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताचे शतक धावफलकावर लावले. ही जोडी दुसऱ्या विकेसाठी मोठी भागिदारी रचणार असे वाटत असतानाच स्टॉयनिला पूल मारण्याचा रोहितचा प्रयत्न फसला आणि तो ४३ धावांवर झेलबाद झाला.
वाचा : पुजारा संघातील ‘व्हाईट वॉकर’ : विराट
रोहित बाद झाल्यावर धावगती वाढण्याची जबाबदारी विराटने आपल्या शिरावर घेतली. त्याने भारताची ५ च्या वर असलेला रनरेट खाली येऊ दिला नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अंबाती रायडूने विराटला चांगली साथ देत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. पण, आक्रमक खेळण्याच्या नादात रायडूने आपली विकेट फेकली. त्यानंतर आलेल्या धोनीने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. विराटने एकदिवसीय सामन्यातील आपले ३९ सावे शतक पूर्ण केले. विराट आणि धोनीच्या खेळीने भारत विजयाच्या उंबरठ्यावर आला असताना विराट १०४ धावांवर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने तडाखेफाज फलंदाजी करत भारताचा विजय सोपा केला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता असतानाच शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने शानदार षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून भारताला विजय मिळवून दिला.
वाचा : बीसीसीआयच्या निर्णयाला गावसकर यांचा पाठिंबा
तत्पूर्वी, भारतासाठी मस्ट विन असणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ॲडलेडच्या उष्ण वातावरणात हा निर्णय अपेक्षितच होता. पण, कांगारुंच्या बॅटिंग पिचवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या मनसुब्यांना भुवनेश्वर आणि शामी या जलदगती जोडीने सुरुंग लावला. या दोघांनीही दोन्ही सलामीवीरांना पाठोपाठ तंबूत पाठवले. भुवनेश्वरने कर्णधार फिंचचा ६ धावांवर त्रिफळा उडवत पहिला धक्का दिला. तर शामीने ॲलेक्स केरीला धवनकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. यामुळे कांगारुंची ८ षटकात २ बाद २६ धावा अशी अवस्था झाली.
वाचा : माफीनंतरही हार्दिक-राहुलवर टांगती तलवार
दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर आलेल्या शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. पण ही भागिदारी फुटली ती जडेजाच्या डायरेक्ट हीटने जडेजाने ख्वाजाचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला २१ धावांवर रनआऊट केले. यानंतर आलेल्या हॅडस्कबच्या साथीने शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाचे शतक स्कोरबोर्डवर लावले. शॉन मार्शने आपले अर्धशतक पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
शॉन मार्शने एक बाजू लावून धरली असताना दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने फलंदाज बाद होत होते. गेल्या सामन्यात ७३ धावांची खेळी करणाऱ्या हँडस्कबने २० धावा करत शॉन मार्शची साथ सोडली. तो जडेजाच्या फिरकीत फसला. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनिसने मार्शबरोबर पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. दरम्यान, शॉन मार्श आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. ही भागिदारी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शामी पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. त्याने स्टॉयनिसला २९ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
स्टॉयनिस बाद झाल्यावर धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल क्रिजवर आला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आपल्या २०० धावा पूर्ण केल्या. याच बरोबर शॉन मार्शनेही आपले वनडेमधील आपले सातवे शानदार शतक पूर्ण केले. अखेरची १० षटके राहिलेली असताना क्रिजवर एक सेट फलंदाज आणि एक धडाकेबाज फलंदाज असल्याने ऑस्ट्रेलिया आता आक्रमक खेळणार या काही शंकाच नव्हती. मॅक्सवेलने ४३ वे षटक टाकणाऱ्या कुलदीप यादवच्या एकाच षटकात दोन षटकार मारत आपले मनसुबे जाहीर केले.
मार्श आणि मॅक्सवेल यांनी अखेरच्या काही षटकात आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, रोहितने धोकादायक मॅक्सवेलला सिराजच्या गोलंदाजीवर जीवनदान दिले. सुदैवाने हे जीवनदान फार धोकादायक ठरले नाही. कारण, भुवनेश्वरने मॅक्सवेलला ४८ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ भुवीने शॉन मार्शची १३१ धावांची शानदार शतकी खेळीही त्याच षटकात संपवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ४८ षटकात ७ बाद २८३ धावा झाल्या. अखेरची दोनच षटके शिल्लक असताना दोन नवीन फलंदाज क्रिजवर आल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला ब्रेक लागला. सिडल ० तर रिचर्डसन १ धावांची भर घालून माघारी परतले. त्यानंतर लायनने अखेरच्या तीन चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारल्याने ऑस्ट्रेलियाला भारतासमोर २९९ धावांचे आव्हान ठेवता आले.

.
Post a Comment