मुंबई :
डान्सबार बंदी उठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा छमछम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय पाळावा लागणार असला तरीही सर्वोच्च न्यायालयात सरकार बाजू मांडण्यात कमी पडले, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच हा निर्णय दुर्दैवी असल्याचीही प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.
डान्सबार संदर्भातल्या राज्य सरकारने घालून दिलेल्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयाने शिथील केल्या आहेत. यामुळे मुंबईसह राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० पर्यंत डान्सबार सुरु राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्याने तो मान्य करावा लागणार आहे. मात्र हा निर्णय दुर्दैवी आहे असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.
राज्यात डान्सबार सुरु होते तेव्हा अनेक अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ढकलले जात होते. प्रसंगी त्यांचे लैंगिक शोषणही केले जात असे. तसेच अनेक पुरुष घर खर्चाचा पैसा डान्सबारमध्ये उधळत. अनेकांचे संसार डान्सबारमुळे देशोधडीला लागले या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आघाडी सरकारने डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यमान सरकार डान्सबारबंदी संदर्भात बाजू मांडण्यात कमी पडले असेही विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

डान्सबार बंदी उठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा छमछम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय पाळावा लागणार असला तरीही सर्वोच्च न्यायालयात सरकार बाजू मांडण्यात कमी पडले, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच हा निर्णय दुर्दैवी असल्याचीही प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.
डान्सबार संदर्भातल्या राज्य सरकारने घालून दिलेल्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयाने शिथील केल्या आहेत. यामुळे मुंबईसह राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० पर्यंत डान्सबार सुरु राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्याने तो मान्य करावा लागणार आहे. मात्र हा निर्णय दुर्दैवी आहे असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.
राज्यात डान्सबार सुरु होते तेव्हा अनेक अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ढकलले जात होते. प्रसंगी त्यांचे लैंगिक शोषणही केले जात असे. तसेच अनेक पुरुष घर खर्चाचा पैसा डान्सबारमध्ये उधळत. अनेकांचे संसार डान्सबारमुळे देशोधडीला लागले या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आघाडी सरकारने डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यमान सरकार डान्सबारबंदी संदर्भात बाजू मांडण्यात कमी पडले असेही विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

Post a Comment