पांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदीसहित भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवचा मृत्यू झाला.
पांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदीसहित भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवचा मृत्यू झाला. केवळ युधिष्ठीर सशरीराने स्वर्गात पोहोचले, हे जवळपास अनेक लोकांना माहिती असेल परंतु युधिष्ठीर व्यतिरिक्त इतर पांडव आणि द्रौपदीचा मृत्यू का झाला हे फार कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, युधिष्ठीर कशाप्रकारे स्वर्गात पोहोचले आणि रस्त्यामध्ये द्रौपदी आणि इतर पांडवांचा का झाला मृत्यू?
अशाप्रकारे सुरु केली पांडवानी स्वर्ग यात्रा
भगवान श्रीकृष्णाच्या मृत्युनंतर महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार द्रौपदीसहित पांडवानी राजपाठ त्याग करून सशरीर स्वर्गात जाण्याचा निश्चय केला. युधिष्ठीरने परीक्षितचा राज्याभिषेक केला. त्यानंतर पांडव आणि द्रौपदीने साधूंचे वस्त्र धारण केले आणि स्वर्गाकडे निघाले.
पांडवांसोबत एक श्वान(कुत्रा)ही चालू लागले. पांडवांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून प्रवास सुरु केला. प्रवास करता-करता पांडव हिमालयापर्यंत पोहोचले. हिमालय ओलांडून पांडव पुढे गेल्यानंतर त्यांना वाळूचा समुद्र दिसला. त्यानंतर त्यांनी सुमेरु पर्वताचे दर्शन घेतले.
सर्वात पहिले झाले द्रौपदीचे पतन
पाच पांडव, द्रौपदी आणि तो श्वान सुमेरु पर्वत चढत असताना द्रौपदी जमिनीवर कोसळली. द्रौपदीला पडलेले पाहून भीमने युधिष्ठीरला विचारले की, द्रौपदीने तर कधीच कोणतेही पाप केले नाही. मग कोणत्या कारणामुळे द्रौपदी कोसळली? युधिष्ठीरने सांगितले की, द्रौपदी आपल्या सर्वांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम करत होती. यामुळे तिच्यासोबत असे घडले. एवढे बोलून युधिष्ठीर द्रौपदीला न पाहताच पुढे मार्गस्थ झाले.
त्यानंतर कोसळले सहदेव
द्रौपदीनंतर थोड्यावेळाने सहदेवसुद्धा कोसळले. भीमने सहदेव पडण्याचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, सहदेव कोणालाही स्वतःपेक्षा जास्त विद्वान समजत नव्हता. याच दोषामुळे त्याची आज ही स्थिती झाली आहे.
असा झाला नकुलचा मृत्यू
द्रौपदी आणि सहदेवनंतर चालता-चालता नकुलसुद्धा खाली पडले. भीमाने नकुल खाली पडण्यामागचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, नकुलला स्वतःच्या रूपाचा खूप अभिमान होता. तो कोणालाही स्वतःप्रमाने रूपवान समजत नव्हता. यामुळे आज त्याची ही गती झाली आहे.
यामुळे झाले अर्जुनाचे पतन
युधिष्ठीर, भीम, अर्जुन आणि श्वान पुढे जात असतानाच अर्जुन जमिनीवर कोसळला. युधिष्ठीरने भीमाला सांगितले की, अर्जुनाला स्वतःच्या पराक्रमावर जास्त अभिमान होता. अर्जुन म्हणाला होता की, मी एका दिवसातच सर्व शत्रूंचा नाश करून टाकेल, परंतु असे केले नाही. स्वतःच्या या अहंकारामुळे अर्जुनाची आज अशी स्थिती झाली आहे.
Post a Comment