दुष्काळ, अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस... अशा अस्मानी संकटांनी गेली काही वर्षे पिचलेल्या बळीराजाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा एल्गार पुकारला असून, आज, गुरुवारी ही शेतकरी एकजूट मुंबईच्या आझाद मैदानात दिसून येणार आहे. सरकारदरबारी म्हणणे मांडण्यासाठी मार्च महिन्यात मुंबईवर 'लाँग मार्च' नेऊनही परिस्थितीत बदल न झाल्याने ठाणे, भुसावळ जिल्ह्यांतील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकवटले असून, मंगळवारी रात्री त्यांनी मुंबईची वेस असलेले ठाणे गाठले. रात्री मुक्काम करून या शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे . मॅगेसेसे पुरस्कारविजेते डॉ. राजेंद्र सिंह हेही त्यांच्यासोबत असून, आज, दुपारपर्यंत हा विराट शेतकरी मोर्चा आझाद मैदानात धडकणार आहे.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांचा एल्गार
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करावी, पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे जमिनीचे अधिकार देण्यात यावेत. त्यानंतर त्यांच्या जमिनी सुधारण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून त्याचा आराखडा सादर करावा. विजेवर सर्वांचा समान अधिकार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी लावून धरल्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठीच हे शेतकरी आज, गुरुवारी मुंबईत धडक देत आहेत.
शेती व्यवसाय तोट्यात असल्यामुळे देण्यात येणाऱ्या मदतीवर या शेतकऱ्यांचाही अधिकार आहे. त्यामुळे वनपट्टेधारकांसह ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत व पीककर्ज मिळावे, अशीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 'लोकसंघर्ष मोर्चा' ही संघटना या मोर्चाचे नेतृत्व करत आहे. विधानसभा अधिवेशनात आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे 'लोकसंघर्ष मोर्चा'च्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या मागण्या
-दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
-दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यावरील असा भेदभाव न करता सरसकट सर्वांना दोन रुपये किलोने धान्य मिळावे.
-आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्टरी पन्नास हजार व बागायत जमिनीला हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
-दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजनांतर्गत महाराष्ट्रात येत्या काळात मागास प्रवर्गातील व्यक्ती, तसेच आदिवासींना किती जमीन मिळणार आहे याचा आराखडा सादर करावा.
वाहतूक विस्कळीत होऊ देणार नाही
शेतकरी मोर्चा बुधवारी रात्री चुनाभट्टी येथील शिवाजी मैदानात मुक्काम करणार असून, आज, गुरुवारी सकाळी मोर्चा आझाद मैदानावर धडकेल. मोर्चाचे शिष्टमंडळ त्यानंतर विधानभवनात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या वाहतुकीला जास्त फटका बसणार नाही याची काळजी घेऊ, असे मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांचा एल्गार
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करावी, पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे जमिनीचे अधिकार देण्यात यावेत. त्यानंतर त्यांच्या जमिनी सुधारण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून त्याचा आराखडा सादर करावा. विजेवर सर्वांचा समान अधिकार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी लावून धरल्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठीच हे शेतकरी आज, गुरुवारी मुंबईत धडक देत आहेत.
शेती व्यवसाय तोट्यात असल्यामुळे देण्यात येणाऱ्या मदतीवर या शेतकऱ्यांचाही अधिकार आहे. त्यामुळे वनपट्टेधारकांसह ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत व पीककर्ज मिळावे, अशीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 'लोकसंघर्ष मोर्चा' ही संघटना या मोर्चाचे नेतृत्व करत आहे. विधानसभा अधिवेशनात आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे 'लोकसंघर्ष मोर्चा'च्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या मागण्या
-दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
-दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यावरील असा भेदभाव न करता सरसकट सर्वांना दोन रुपये किलोने धान्य मिळावे.
-आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्टरी पन्नास हजार व बागायत जमिनीला हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
-दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजनांतर्गत महाराष्ट्रात येत्या काळात मागास प्रवर्गातील व्यक्ती, तसेच आदिवासींना किती जमीन मिळणार आहे याचा आराखडा सादर करावा.
वाहतूक विस्कळीत होऊ देणार नाही
शेतकरी मोर्चा बुधवारी रात्री चुनाभट्टी येथील शिवाजी मैदानात मुक्काम करणार असून, आज, गुरुवारी सकाळी मोर्चा आझाद मैदानावर धडकेल. मोर्चाचे शिष्टमंडळ त्यानंतर विधानभवनात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या वाहतुकीला जास्त फटका बसणार नाही याची काळजी घेऊ, असे मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment