नवी दिल्ली - मुझफ्फरपूर शेल्टर होम अत्याचार प्रकरणात चुकीचा एफआयआर दाखल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने बिहार सरकारला फटकारले आहे. अख्ख्या देशात खळबळ माजणाऱ्या बिहार शेल्टर होम प्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेणार अशी ग्वाही दिली होती. हेच का आपले गांभीर्य? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला खडेबोल सुनावले. मुझफ्फरनगर शेल्टर होममध्ये लहान मुलींवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. त्या प्रकरणात एफआयआर दाखल करताना पोक्सोचा उल्लेखही करण्यात आला नाही. प्रत्येकवेळा या प्रकरणाची फाइल वाचताना आपल्याला अतिशय दुख होतो असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment