महापाैरांना नागरिकांचा घेराव
परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापाैर मुक्ता टिळक या दांडेकर पुल परिसरातील जनता वसाहतीत अाल्या असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घालत अाम्हाला नुकसान भरपार्इ काेण देणार, अामच्या मदतीला वेळेला प्रशासनाचे काेणीच धावून अाले नाही असे सांगत तक्रारींचा भडिमार केला. टिळक यांनी याप्रकरणी मनपाने वारंवार पाटबंधारे खात्यास सूचना दिल्या हाेत्या असे सांगत सध्या अाप्तकालीन परिस्थीतीशी सामना करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. लाेकांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून सर्व लाेकप्रतीनिधींनी मिळून त्यावर उपाययाेजना करु असे स्पष्ट केले अाहे. कालव्याशी संबंधित काेणत्या तृटी राहिल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवार्इ केली जार्इल असे त्यांनी सांगितले.
गळती वाढत गेल्याने घटना घडली
मुठा उजवा कालवा नेमका ज्याठिकाणी फुटला त्याबाबतची पाहणी केल्यावर खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, कालव्याच्या भिंतीच्या विविध ठिकाणी गळती हाेत असून सदर गळती याठिकाणी वाढत जाऊन कालवा फुटला अाहे. पुण्याचे पाणी पुरवठयावर ही या दुर्घटनेमुळे परिणाम हाेणार अाहे. खडकवासला धरणातून निघाल्यानंतर हा कालवा पर्वती जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत येताे. तिथपर्यंत पाणी घेता येर्इल मात्र, त्यापुढे पाणी नेता येणार नाही. त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून पुण्यातील ज्या भागाला पाणी जाते ताे भाग वगळुन उर्वरित भागाला पाणीपुरवठा करता येणार नाही. पर्वती जलशुध्दीकरण केंद्रानंतर पाणी कॅन्टान्मेंट जलशुध्दीकरण केंद्र व इतर केंद्रात जात असते, मात्र कालवा फुटल्याने तिथपर्यंत पाणी पाेहचवता येणार नाही.
कालव्याच्या डागडुजीस दाेन काेटी खर्च केला नाही
माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवार म्हणाले, खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे दुष्काळी भागाला तसेच शेतीला पाणीपुरवठा केला जाताे. कालव्याची डागडुजी करण्याकरिता दाेन काेटीचा खर्च करणे अपेक्षित हाेते मात्र, ताे सरकारने न केल्याने ही दुर्घटना घडली. भाजपच्या गलथन कारभारचा पुण्यातील नागरिकांना फटका बसला असून लाेकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे संसार वाहून गेल्याने माेठे नुकसान झाले अाहे त्याची नुकसान भरपार्इ शासनाने द्यावी. लाखाे लिटर शेतीचे व पिण्याचे पाणी या दुर्घटनेमुळे वाया गेले असून त्याला काेण जबाबदार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.सत्ताधारी भाजप मध्ये प्रशासनाकडून काम करुन घेण्याची धमक नसल्याची खरमरीत टिका त्यांनी याप्रसंगी केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करू पाहा... संबंधित फोटो..
Post a comment