मुंबई- 'रामायण, महाभारताची देशाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे या देशाचेच घटक असून मला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार त्यांना आहे. ते देशाचे हिस्सेदार आहेत, हे कुणीही सांगण्याची आवश्यकता नाही. ते जन्मत:च या देशाचे नागरिक आणि हिस्सेदार आहेत', असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लिमांबाबत वक्तव्य करणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला. 'भारिप'चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्याच्या टीकेलाही पवारांनी प्रत्त्युत्तर दिले. 'आमची मदत जेव्हा घेतली तेहा आम्ही धर्मनिरपेक्ष नव्हतो का?' असा प्रतिसवाल करत प्रकाश अांबेडकरांनी अाम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवण्याची गरज नाही, असेही पवार यांनी ठणकावले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment