
ड्युब्लिनः टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार, असं बिरूद मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं पुन्हा एकदा आपल्या वागण्यातून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी आदर्श घालून दिला आहे. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण, प्लेइंग-11मध्ये नसतानाही त्यानं आपल्या 'कामगिरी'नं चाहत्यांची मनं जिंकली.
सुरेश रैनानं पीचवरून पाण्यासाठी इशारा केल्यानंतर जे दृश्य दिसलं त्याने सगळेच चकित झाले. साक्षात महेंद्रसिंह धोनी आपली किट बॅग आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात उतरला आणि त्यानं रैनासह मनीष पांडेला पाणी दिलं. त्यातून धोनीचा साधेपणा पुन्हा दिसला. त्याचे पाय अजूनही जमिनीवर असल्याचं जाणवलं. जग जिंकलं तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही, ही शिकवण क्रिकेटमधील नवोदितांनी 'जंटलमन' धोनीकडून घ्यायला हवी.
Post a Comment