0


सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी कुटुंबाला हक्काचे घर मिळाले. मात्र या कुटुंबप्रमुख आणि त्याच्या पत्नीचे निधन झाल्याने या घराचे काय करायचे, असा प्रश्न समोर आला. या कुटुंबप्रमुखाची एक मुलगी आपल्या मानलेल्या मामाकडे राहत असल्याची माहिती मिळाली आणि या सामाजिक कार्यकत्याकडून या मुलीचा शोध सुरू झाला. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर या आदिवासी मुलीचे शोधकार्य संपले. आता या मुलीला तिच्या वडिलांना मिळालेले महापालिकेचे घर सुपूर्द करण्यात येणार आहे.. ही कहाणी आहे, वैशाली वाघे या मुलीची.
मीरा-भाईंदर महापालिकेचे सध्याचे मुख्यालय उभे असलेल्या जागी आधी एक तलाव होता. या तलावाच्या काठी काही आदिवासींची घरे होती. त्यात प्रकाश वाघे यांचेही घर होते. २०००मध्ये तलावाच्या जागी मुख्यालयाचे काम सुरू झाल्यानंतर इथल्या आदिवासांना सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ असलेल्या आंबेडकर नगरात आणि त्यानंतर काही दिवसांनी मीरा रोडच्या महापौर निवासासमोर असलेल्या शासकीय भूखंडावर विस्थापित करण्यात आले. याच दरम्यान प्रकाश वाघे याची पत्नी मंजुळा हिचे २००८ मध्ये निधन झाल्याने प्रकाश यांनी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या वैशालीला तिच्या मानलेल्या मामाकडे सांभाळ करण्यासाठी पाठवले.

Post a Comment

 
Top