
जमशेदपूर - येथे रविवारी एका विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. महिलेच्या माहेरच्यांनी याला खून असल्याचे सांगितले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण विष असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत्यूच्या एका महिन्यापूर्वी विवाहितेला याची चाहूल लागली होती की तिचा खून होऊ शकतो. यामुळे तिने आपल्या खुनाची शंका जाहीर करत वडिलांना एक पत्र पाठवले होते. बुधवारी पती आणि दिराला कोर्टात सादर करण्यात आले. तिथून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
महिलेच्या वडिलांनुसार, एका महिन्यापूर्वी मुलीने एक पत्र लिहिले होते. ज्यात त्याने नवऱ्याच्या जुलुमाची कहाणी लिहिली होती. पत्रात लिहिले होते की, तिचा पती तिला बळजबरी दारू पाजतो आणि सिगारेट ओढायला लावतो. एवढेच नाही, तर तोंडावर टेप लावून तिला बेदम मारहाणही करतो.
स्मशानातून पळाला पती
- मृत महिलेचे अंत्य संस्कार मंगळवारी करण्यात आले. पोलिसांना अंदाज होता की, खुनाचा गुन्हा दाखल होताच तिचा नवरा पळून जाऊ शकतो. यामुळे ते त्याच्या अटकेसाठी स्मशानात पोहोचले. पोलिसांना येताना पाहून पती तेथून फरार झाला. यानंतर पोलिसांनी तिथे उपस्थित मृत महिलेच्या दिराला - विकासला अटक केली.
पोलिस जाताच तिचा पती टिंकू व्यास परतला, परंतु मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी त्याला पकडून ठेवले. त्याला बेदम मारहाण केली, मग निवांत पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.
- जखमी अवस्थेत टिंकू आणि त्याच्या भावाला कोर्टात सादर करण्यात आले, तेथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. टिंकू जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- मृत महिलेचे अंत्य संस्कार मंगळवारी करण्यात आले. पोलिसांना अंदाज होता की, खुनाचा गुन्हा दाखल होताच तिचा नवरा पळून जाऊ शकतो. यामुळे ते त्याच्या अटकेसाठी स्मशानात पोहोचले. पोलिसांना येताना पाहून पती तेथून फरार झाला. यानंतर पोलिसांनी तिथे उपस्थित मृत महिलेच्या दिराला - विकासला अटक केली.
पोलिस जाताच तिचा पती टिंकू व्यास परतला, परंतु मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी त्याला पकडून ठेवले. त्याला बेदम मारहाण केली, मग निवांत पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.
- जखमी अवस्थेत टिंकू आणि त्याच्या भावाला कोर्टात सादर करण्यात आले, तेथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. टिंकू जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिठ्ठीत लिहिले होते दु:ख
- वडील जितेंद्र सिंह म्हणाले, मुलगी प्रीतीचे 2008 मध्ये लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसांनीच जावई आणि त्याच्या आईने (माया देवी) तिचा छळ करायला सुरुवात केली.
- प्रीतीने आम्हाला एक पत्र पाठवले, ज्यात तिने तिचे सगळे दु:ख लिहिले होते. सासरचे 3 लाखांची मागणी करत होते.
- त्यांच्या छळाला कंटाळून माझ्या मुलीने दोन महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रारही दिली होती. परंतु, नंतर समजूत घातली आणि केस परत घेतली.
- वडील जितेंद्र सिंह म्हणाले, मुलगी प्रीतीचे 2008 मध्ये लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसांनीच जावई आणि त्याच्या आईने (माया देवी) तिचा छळ करायला सुरुवात केली.
- प्रीतीने आम्हाला एक पत्र पाठवले, ज्यात तिने तिचे सगळे दु:ख लिहिले होते. सासरचे 3 लाखांची मागणी करत होते.
- त्यांच्या छळाला कंटाळून माझ्या मुलीने दोन महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रारही दिली होती. परंतु, नंतर समजूत घातली आणि केस परत घेतली.
तोंडाला टेप लावून नवरा बेदम मारायचा, सासूही द्यायची साथ
- वडील म्हणाले, सासरच्यांनी तिला काहीतरी पाजले होते. यामुळे ती बेशुद्ध होती. मुलीने आधी सांगितले होते की, पती आणि सासू नेहमी माझ्या तोंडाला टेप लावून बेदम मारहाण करतात.
- ते म्हणाले, घटनेच्या रात्री पत्नी (आशा देवी) चे प्रीतीशी मोबाइलवर बोलणे झाले होते, तेव्हा तिने सांगितले होते की, सासू आणि नवऱ्याने माझ्याशी पुन्हा भांडण केले.
- रात्री एक वाजता तिच्या नवऱ्याने फोन करून सांगितले की, तुमची मुलगी मेली आहे. ते म्हणाले, तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनीच तिचा खून केला. पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
- वडील म्हणाले, सासरच्यांनी तिला काहीतरी पाजले होते. यामुळे ती बेशुद्ध होती. मुलीने आधी सांगितले होते की, पती आणि सासू नेहमी माझ्या तोंडाला टेप लावून बेदम मारहाण करतात.
- ते म्हणाले, घटनेच्या रात्री पत्नी (आशा देवी) चे प्रीतीशी मोबाइलवर बोलणे झाले होते, तेव्हा तिने सांगितले होते की, सासू आणि नवऱ्याने माझ्याशी पुन्हा भांडण केले.
- रात्री एक वाजता तिच्या नवऱ्याने फोन करून सांगितले की, तुमची मुलगी मेली आहे. ते म्हणाले, तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनीच तिचा खून केला. पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
Post a Comment