
'परदेशात फॉर्म राखायचाय'
माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम असल्याचे म्हटले. कोहली म्हणाला, ‘गावसकरांकडून अशा प्रकारे कौतुक होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्यांनी मागील काही काळात अनेक भारतीय संघ बघितले आहेत. मात्र, आमच्या या संघाला अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. सध्या आम्ही भारतातच अधिक सामने खेळत आहोत. हाच फॉर्म आम्हाला परदेशातही कायम राखायचा आहे. असे करू शकलो, तर आम्हाला आनंदच होईल.’ भारताला चौथ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. सध्या भारतीय संघ मालिकेत ३-१ने आघाडीवर आहे. मालिकेतील पाचवा वन-डे सामना रविवारी नागपूर येथे होणार आहे.मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर भारताने संघात बदल केले. कुलदीप यादव, भुवनेश्वरकुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या ऐवजी उमेश यादव, महंमद शमी आणि अक्षर पटेलला संधी देण्यात आली. मात्र, भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीला लवकर रोखण्यात अपयश आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३३४ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, कोहलीने राखीव खेळाडूंना संधी देण्याच्या संघ व्यवस्थापनच्या निर्णयाचे समर्थन केले. कोहलीने हार्दिक पंड्या आणि केदार जाधवचेही कौतुक केले.
Post a Comment